मोठी बातमी : ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही तिथे भाजपचा संपर्कमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी खेळी, कोणाची कुठे नियुक्ती?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भारतीय जनता पक्षाकडून सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी विशेष नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. भाजपने संपर्क मंत्री पदाची निर्मिती केली असून आता भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री काम करणार आहेत.
पालकमंत्रिपदाच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण करून कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यावर पक्षाचा भर असेल. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे कोणतेही काम अडू नये तसेच सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा, यासाठी संपर्कमंत्री प्रयत्न करतील, असे सांगण्यात येते.
ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही, तिथे जाऊन संपर्कमंत्री कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतील. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू असताना युतीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा बळी जाऊ नये वा त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मात्र संपर्कमंत्री नेमून अप्रत्यक्षपणे मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर धाक राहावा, यासाठी भाजपने मोठी चाल खेळल्याची चर्चा सुरू आहे.
ठाणे- गणेश नाईक संपर्क मंत्री (पालकमंत्री एकनाथ शिंदे)
बीड-ब पंकजा मुंडे, संपर्क मंत्री, (पालकमंत्री-अजित पवार)
संभाजीनगर- अतुल सावे, संपर्क मंत्री (पालकमंत्री- संजय शिरसाट)
पुणे- चंद्रकांत पाटील,संपर्क मंत्री (पालकमंत्री- अजित पवार)
कोल्हापूर- माधुरी मिसाळ, संपर्क मंत्री (पालकमंत्री- प्रकाश आबिटकर)
रायगड – नितेश राणे,संपर्क मंत्री
सोलापूर, सातारा – शिवेंद्र राजे – संपर्क मंत्री. धाराशिव – जयकुमार गोरे – संपर्क मंत्री
रत्नागिरी – आशिष शेलार -संपर्क मंत्री
जळगाव – गिरीश महाजन – संपर्क मंत्री
नंदुरबार – जयकुमार रावल -संपर्क मंत्री
मुंबई शहर – मंगलप्रभात लोढा – संपर्क मंत्री
यवतमाळ – अशोक उईके -संपर्क मंत्री – संपर्क मंत्री
हिंगोली – मेघना बोर्डीकर -संपर्क मंत्री
बुलढाणा – आकाश फुंडकर -संपर्क मंत्री
गोंदिया – पंकज भोयर -संपर्क मंत्री
वाशीम – राधाकृष्ण विखे पाटील – संपर्क मंत्री

दरम्यान, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये युती करायची की स्वतंत्र लढायचे, यावरुन अजून निर्णय झालेला नाही. या परिस्थितीत युती झालीच नाही तर ‘शतप्रतिशत भाजप’ असा नारा देण्याचा हेतू ठेवूनच भाजपने मंत्र्यांकडे जिल्ह्यांच्या संपर्क मंत्रीपदांची जबाबदारी दिली असल्याची चर्चा सुरु आहे.