ब्रेकिंग : एक रुपयात पिक विमा योजना बंद, पुन्हा पूर्वीचीच पीक विमा योजना सुरू
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक रुपयात पीक विम्याची गेली दोन वर्षे राज्यात सुरू असलेली योजना आता बंद करण्यात आली आहे. या योजनेत दोन वर्षात कोट्यवधी रुपयांचा घोटाळे झाल्याचे आरोप संपूर्ण राज्यातून जिल्ह्याजिल्ह्यात झाले होते.
हे घोटाळे कसे झाले याचे पुरावेही वेळोवेळी समोर मांडण्यात आले होते. यात शेतकरी नसताना दुसऱ्यांच्या नावावरील शेताला स्वतः चे नाव दाखवून पिक विमा काढण्यात आले.मर्यादा असताना पाच एकर च्या वर शेती असणारी दुसऱ्यांच्या नावावर विमा काढण्यात आले.अशी वेगवेगळे फंडे वापरून बोगस कागदपत्रे तयार करून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाखो रुपये लाटले.
या अशा घटना उघडकीस आल्याने या योजनेवर सर्व स्तरांमधून टीका केली जात होती. शेतकरी वर्गातही नाराजी होती. त्यामुळे चौफेर टीकेनंतर योजना बंद करण्यात आली आहे.
त्या मुळे आता पूर्वीची पीक विमा योजना पूर्वी राज्यात असलेली पद्धत पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे.
शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरायचा आणि त्यात राज्य सरकार आपला आर्थिक सहभाग देऊन विमा कंपन्यांना रक्कम दिली जाईल. पीक विम्यापोटी संरक्षित विमा रकमेच्या दोन टक्के (खरिप पिकांसाठी), दीड टक्के (रब्बी पिकांसाठी) तर पाच टक्के (नगदी पिकांसाठी) असा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. पीक विमा योजना राबविण्यासाठी विमा कंपन्यांची नावे निविदेद्वारे निश्चित करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही आहे त्या स्वरुपातच चालू ठेवली जाईल, असा निर्णयदेखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा