भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के, जमीन अचानक हादरली…

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज बुधवारी भूकंपाचे सौम्य धक्के महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बसले. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, अहेरी, सिरोंचा यांसह अनेक ठिकाणी बुधवारी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्क बसलेत. भूकंपाचे हे धक्के सौम्य असले तरी नागरिकांमध्ये त्या मुळे घबराट निर्माण झाली. मात्र सुदैवाने या धक्क्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानि झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. सिरोंचा येथे गेल्या दोन वर्षांमध्ये तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसले आहे.

गडचिरोली जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्येही तसेच गोंदियातील काही परिसरामध्ये देखील आज सकाळीच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली. सकाळी ७.३० वाजेच्या च्या सुमारास अचानक जमीन हादरू लागली. काय होतय ,कळेनासं झालं. मात्र भूकंप होत असल्याचे जाणवताच नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कुठलीही जीवित हानी अथवा आर्थिक नुकसान झाले नसल्याचे सांगितले जाते.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार,
महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, जिल्ह्यातील गडचिरोली सह अनेक भागांत जाणवलेल्या या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हा तेलंगणमध्ये होता. तेलंगणमधील मुलुगु जिल्ह्यात सकाळी रिश्टर स्केलवर ५.३ तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे झटके हैदराबादमध्येही बसले. सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून ४० किलोमीटर खोल होते.

यामुळे कोणतेही नुकसान झाले नसले तरी संबधित अधिकारी हे या परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. तर स्थानिकांना भूकंपाच्या वेळी सतर्क रहावे तसेच गर्दीच्या जागांपासून किंवा असुरक्षित इमारतींपासून दूर राहावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

तेलंगणमध्ये बसलेला भूकंपाचा झटका थोडा तीव्र होता. अनेकांच्या त्यामुळे भीतीने थरकाप उडाला आणि ते जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. काही काळ जमीन हादरली, भूकंपाच्या धक्क्याने खुर्च्यांवर बसलेले अनेक जण खाली पडले असा दावा करण्यात आला. भूकंपाचा केंद्रबिंदू मुलुगु जिल्ह्यातील मेदारम परिसर असल्याचे सांगण्यात येत आहे. या पूर्वीही ४ सप्टेंबर २०२४ रोजी मेदारममध्ये सुमारे एक लाख झाडे उन्मळून पडली आणि आता बरोबर चार महिन्यांनंतर याच परिसरात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे.

त्याच प्रमाणे छत्तीसगड राज्यातील भूपालपटनम येथेही नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. तेलंगण राज्यातील मुलुगू हा परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते. मुलूगू येथे जाणावलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ इतकी होती.

या ठिकठिकाणी झालेल्या भूकंपात कोणतेही नुकसान झाले नसले तरी संबधित अधिकारी हे या परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. तर स्थानिकांना भूकंपाच्या वेळी सतर्क रहावे तसेच गर्दीच्या जागांपासून किंवा असुरक्षित इमारतींपासून दूर राहावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!