भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव मध्ये किरीट सोमय्यांचा गौप्यस्पोट, ” ते” बनावट दाखला घेणारे बांगलादेशीच, पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पोलिस तपासात जळगाव मध्ये ४३ बनावट जन्म दाखला प्रमाणपत्र प्रकरण उघळकीस आले. जळगावात बोगस व तहसीलदारांच्या बनावट सह्या करून खोटे जन्म दाखले घेतले गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या पार्श्वभूमीवर सोमय्या हे मंगळवारी दुपारी ३ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. त्यांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. तब्बल एक तास बंद कॅबिनमध्ये त्यांनी या गंभीर प्रकरणाबद्दल डॉ.रेड्डी यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाजपचे काही पदाधिकारीही उपस्थित होते. ही चर्चा आटोपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात २०२४ विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेदरम्यान मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांनी बनावट जन्मदाखले मिळविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चौकशीअंती राज्यात १७ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि या फसव्या, बनावट दाखल्यांचा घोटाळा सहा महिन्यात समोर आला, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवार रोजी जळगावात माध्यमांशी बोलताना केला.

ते पुढे म्हणाले की, भारत सरकार एजन्सीकडून चौकशी २०२४ मध्ये आचार संहिता दरम्यान, २ लाख २३ हजार लोकांचे अर्ज जन्म दाखल्यांसाठी राज्यातील विविध ठिकाणी प्राप्त झाले. या अनेक अपात्र लोकांनी जन्मदाखले प्राप्त केले. यामध्ये २५ ते ६५ वयोगटातील लोकांचा समावेश असून बनावट दाखले घेणारे बांगलादेशी असून याप्रकरणी सर्वंकष चौकशी करण्याची गरज आहे, असे किरीट सोमय्या यांनी या वेळी नमूद केले.

सिल्लोडचे बांगलादेश कनेक्शन पाच हजारांहून अधिक लोकांनी जन्मदाखला घेण्यासाठी केवळ आधारकार्ड हा पुरावा दिला आहे. सिल्लोड येथे बोगस दाखले घेणारे सर्वाधिक ९० टक्के मुस्लीम असून त्यांचे बांगलादेश कनेक्शन आहे. या ठिकाणी त्यांचा मोठा प्रभाव आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. योग्यवेळी केंद्रीय एजन्सी एटीएस आणि एमआयएकडून चौकशी भारत सरकारच्या गृह विभागाचे बोगस जन्म दाखले प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे. केंद्राच्या एटीएस आणि एमआयए या एजन्सींशी मी याविषयी चर्चा करून त्यांना राज्यातील या बनावट प्रकरणाची माहिती दिली. योग्य वेळी या एजन्सी चौकशीत प्रत्यक्ष सहभागी होतील. बोगस जन्म दाखले संदर्भात केंद्रीय गृह खात्याने राज्य शासनाकडून अहवालही मागविला आहे, असे ही ते म्हणाले.

भारतात जन्मले, तर त्याची नोंद होते मात्र या लोकांनी ते कागदपत्रे दाखले घेण्यासाठी ते सादर केले नाहीत म्हणजे ते त्यांच्याकडे नव्हतेच. देशातील रहिवासी असल्याचे कागदपत्रे न देता त्यांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. तो कशासाठी? मग ते नेमके मूळ कोठले? हे प्रश्न उपस्थित होतात. यांची चौकशी गरजेची असल्याचे सोमय्या म्हणाले.

मालेगावात बोगस दाखला २०२० मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात मालेगाव येथे पोलिसांनी सोमवार ७ एप्रिल रोजी एकाला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याच्याकडे बोगस दाखला असल्याचा मामला उघडकीस आला. त्यामुळे या बनावट दाखल्यांची व्याप्ती मोठी असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक
जळगाव शहरात ४३ बनावट दाखल्यांचे प्रकरण उघडकीस आले. यासंदर्भात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी जलदगतीने तपासाला चालना दिली. मनपा, जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या समन्वयातून बोगस दाखल्यांचा फ्रॉड पकडला गेला. दोन वकिलांना अटक केली. या फसवणूक प्रकरणामागे कोण आहे? हे तपासातून समोर येईलच. पोलिसांची ही मोठी उपलब्धी आहे, असे सांगून सोमय्या यांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीचे कौतुक केले. त्याच बरोबर जळगाव जिल्ह्यात अन्यत्रही या संशयास्पद प्रकारांच्या सखोल चौकशीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!