“काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार” भाजप नेत्याचं सूचक ट्विट
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : विधान परिषदेच्या मतदानाला सुरूवात झाली असून त्याआधी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. “काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार”, असं खासदार अनिल बोंडे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
- संघटनात्मक निवडी जाहीर होण्याआधीच, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वेदना कधी ओळखणार ? ….तर पक्ष आणि नेत्याचं भवितव्य संकटात येईल ! आशयाची पेपर कटिंग कार्यकर्त्यांकडून तुफान केली जातेय शेयर
- मुक्ताईनगर/बोदवड तालुका व शहर काँग्रेस कमिटी आढावा बैठक संपन्न….
- दोन नंबरचे अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना पक्षात घेऊ नका, पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्षांनी केले स्पष्ट
अनिल बोंडे यांनी विधान परिषद निवडणुकीत कुणाचा पराभव होणार याचं भाकित वर्तवलं आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे. आकडेवारीचं गणित पाहता महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे या लढाईतून कोण बाहेर पडणार याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अश्यातच अनिल बोंडे यांनी हे सूचक ट्विट केलं आहे.
विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश पाडवी हे रिंगणात आहेत.तर काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे निवडणूक लढवत आहेत. संख्याबळ पाहता काँग्रेसचा एक उमेदवार पराभीत होईल, असा अंदाज आहे. त्यावरच भाष्य करणारं आणि निवडणुकीच्या निकालाचं भाकित वर्तवणारं ट्विट अनिल बोंडे यांनी केलं आहे. मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे तडजोड करतील, असं बोंडे यांचं म्हणणं आहे. भाई जगताप किंवा चंद्रकांत हंडोरे यांच्या हातून निवडणूक निसणार असल्याचं बोललं जात आहे. पण तसं न होता आमश पाडवी यांचा या सगळ्या राजकारणात राजकीय बळी जाणार, असं बोंडेंनी म्हटलंय.
भाजपला स्वतःचे संख्याबळ आणि सोबतचे अपक्ष मिळून ११२ एवढे संख्याबळ असल्याने पाचव्या जागेसाठी १८ मतांची गरज आहे. आज सकाळी ९ वाजता विधानभवनात मतदानास सुरुवात झालीय, तर रात्री साधारण ८ पर्यंत निकाल अपेक्षित आहे.