अजिंठा लेणीतील आग्या मधमाशांच्या हल्ल्यात ४०० च्या वर पर्यटक जखमी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांत अजिंठा आणि वेरूळ लेणीत मधमाशांकडून पर्यटकांवर हल्ला होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
एका च दिवसात आग्या मधमाशांनी दोन वेळा पर्यटकांवर हल्ला झाला केला असून या मधमाशांच्या हल्ल्यात तब्बल ४०० हून अधिक पर्यटक जखमी झाले आहे. आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लेणी क्रमांक ४,९,१० आणि २६ मध्ये मधमाशांचे पोळे आहेत.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात शनिवारी
पहिला हल्ला लेणी क्रमांक १० जवळ दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास झाला. अचानक मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घबराटीमुळे अनेक पर्यटकांनी लेणी परिसरातून पळ काढून सप्तकुंड धबधबा परिसराकडे धाव घेतली. मात्र, तिथेही दुर्दैव टळले नाही. साडेचारच्या सुमारास सप्तकुंड धबधबा परिसरात तेथे असलेल्या मोहळातील मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यातही काही पर्यटक जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेले पर्यटक सैरावैरा धावू लागले. सुमारे अर्धा तास मधमाशांचा हा तांडव सुरू राहिला. शनिवार रोजी सुमारे ५०० च्या वर पर्यटक अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते.
एकाच दिवसात आग्या मोहोळानं पर्यटकांवर दोनदा हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यामुळे पर्यटकांनी लेणी परिसरातून पळ काढून सप्तकुंड धबधबा परिसराकडे धाव घेत सैरावैरा पळत सुटले .यात ४०० हून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तातडीने योग्य उपाययोजना न झाल्यास भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.