भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रसामाजिक

तीन मुलींची आई पळाली प्रियकरा सोबत, तर वडील पळाले प्रेयसी सोबत, मुले मात्र वाऱ्यावर

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ प्रेमाची भाषा काय? असं म्हणतात प्रेम आंधळ असत, मात्र ते इतके आंधळ नको की स्वतः च्या पोटच्या मुलांना सोडुन पळून जाणं. आपण असे आई- वडील कधी पाहिलेत का, आपल्या पोटच्या लेकरांना प्रेमाखातीर सोडून देणारे निर्दयी, हो असे निर्दयी आई-वडील छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आले आहेत. एक सात वर्षीय, नऊ वर्षीय आणि अकरा वर्ष अशा तीन मुलींना घरात सोडून वडील प्रेयसीसोबत, तर आई प्रियकरासोबत पसार झाले. आईने दुसरे लग्न केले, बापही घरातून निघून गेला व प्रियेसि सोबत राहू लागला. धक्कादायक म्हणजे या घटनेला तीन महिले उलटले असून, दोघांपैकी एकही जण घरी न परतल्याने मुलं उघड्यावर आली आहेत.

संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुलक्षणा व सुनील (दोन्ही नावे बदललेली) हे जोडपे काही महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहत होते. त्यांना तीन मुली असतानाच दोघांचे बाहेर वैयक्तिक विवाहबाह्य संबंध सुरू झाले. दोघेही प्रेमात एवढे अंधळे झाले की त्यांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नव्हता. अनेकदा मुलांना ते मारहाण देखील करायचे. घरात सतत चिडचिडेपणा पाहायला मिळायचा. पुढे काही दिवसांनी आई प्रियकरासोबत निघून गेल्याने, वडील देखील आपल्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी कुठेतरी निघून गेले. आई-वडील घरी येत नसल्याने मुलांना त्यांची चिंता लागली. पण तीन महिने झाले अजूनही आई-वडिलांनी आपल्या मुलांकडे एकदाही येऊन त्यांची विचारपूस केली नाही. तर, मागील अडीच महिन्यांपासून आई- वडिलांच्या प्रतीक्षेत मुलींच्या डोळ्यातील अश्रू क्षणभरही थांबले नाहीत.

गेल्या तीन महिन्यांपासून तिन्ही चिमुकल्यांनी घरात होते नव्हत त्यावर आपले पोटाची भूक भागविली. जेव्हा याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली तेव्हा ते देखील मुलांच्या मदतीला धावून आले. शेजाऱ्यांनी या मुलांना दोन वेळेचे जेवण दिले. मात्र, हे किती दिवस चालणार म्हणून शेजारच्यांनी पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला.

गेल्या तीन महिन्यांपासून तीन मुली घरात एकटयाच राहात असल्याचे माहिती दिली. यावर सातारा पोलिसांनी खात्री करून हे प्रकरण बाल कल्याण समितीसमोर ठेवले. बाल कल्याण समितीने तातडीने निर्णय घेत तिन्ही मुलींना छावणीतील विध्यादिप बालगृहात पाठविले. या प्रकरणी आई वडिलांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!