भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

बिगुल वाजला, दिवाळी नंतर होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेले किमान तीन ते किमान पाच वर्षांपासून राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रतीक्षा अखेर संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचनाही दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभाग रचनेची प्राथमिक प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट लागू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी सर्वप्रथम प्रभाग रचना त्यानंतर आरक्षण निश्चिती, मतदारयाद्या आणि मग प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम अशा चार प्रमुख प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर ३५ दिवसांत निवडणूक कार्यक्रम पूर्ण करावा, असा संकेत आहे.

पंचायत समित्या आधी
यंदा दिवाळी ऑक्टोबरच्या २० तारखेला आहे.

दिवाळीनंतरच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

निवडणुका कधी होणार?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला निवडणूक प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मुभा दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया सप्टेंबरच्या आत पूर्ण करणे कठीण असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आयोग ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करू शकतो.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यांत घेतल्या जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय पुढील आठवड्यांत अपेक्षित आहे.


राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा झाल्या, विधानसभांच्या निवडणूकही झाल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. त्याशिवाय जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या महापालिका, नगरपालिकांसह जिल्हा परिषदांच्याही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुका ‘मिनी विधानसभा’ निवडणुका असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!