थरार….जिल्हा हादरला ! ४ गोळ्या झाडल्या…१५ वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या खुनाचा घेतला बदला !
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेल्या १५ वर्षांपूर्वी वडिलांचा खून केल्याचा आरोप असलेल्या आरोपींचा बंदुकीने बेछूट गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे घडली. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मंगळवारी दि. २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका तरुणावर बेछूट गोळीबार करीत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान, ही घटना १५ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला म्हणून घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गोपाळ सोमा मालचे (वय ४०, रा. वाकटुकी ता.धरणगाव) याने सन २०१० साली राहुल ज्ञानेश्वर सावंत (कोळी) याचे वडील ज्ञानेश्वर सावंत कोळी यांचा खून केल्याचा गुन्हा दाखल होऊन तो प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या खून प्रकरणांमध्ये गोपाळ मालचे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान बदल्यांच्या भावनेने मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी संशयित आरोपी राहुल ज्ञानेश्वर सावंत (कोळी) हा गोपाळ मालचे याच्यावर दबा धरून बसला होता. त्याचे वडील ज्ञानेश्वर सावंत कोळी यांचा २०१० साली खून झाला होता व तो खून गोपाळ मालचे यांनी केल्याचे त्याचे म्हणणे आहे.
रात्री ८ वाजता धरणगाव तालुक्यातील वाकटुकी फाट्याजवळ गोपाळ मालचे हे आले असता त्यांच्यावर राहुल सावंत याने त्याच्याकडील गावठी पिस्तुलातून बेछूट चार वेळेस गोळीबार करीत हत्या केली. थेट डोक्यामध्ये गोळी शिरल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे धरणगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोळीबार केल्यानंतर संशयित आरोपी राहुल सावंत कोळी हा स्वतःहून धरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेत आहेत. तर याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम धरणगाव पोलीस स्टेशनला सुरू होते. तसेच मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे काम सुरू होते.