तापी पात्रात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू,भुसावळ शहरातील घटना
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ येथे नातेवाईकांकडे भुसावळ येथे कार्यक्रमासाठी आलेल्या जालन्यातील मामा-भाच्याचा राहुल नगराकडील घाटावर तापी नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
अधिक वृत्त असे कि, भुसावळ शहरातील मामाची टॉकीज जवळील पेंढारवाडा येथे जालना येथून संदीप हरिश्चंद्र रणधीर यांच्या घरी देवाच्या कार्यक्रमासाठी मामा रामराजे नंदलाल नाटेकर (वय ४७) आणि भाचा आर्यन गाळे (वय १८) हे आलेले होते. बुधवार २१ मे रोजी सकाळी भुसावळ शहरातील नदीपत्रात अंघोळीसाठी मामा रामराजे नाटेकर आणि आर्यन काळे हे गेले होते.
दरम्यान आंघोळ करत असताना त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते दोघेही पाण्यात बुडाले दरम्यान या दोघांना परिसरातील नागरिकांनी पाण्याबाहेर काढून भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमन चौधरी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या दोघांचा मृतदेह जालना येथे अंत्यविधी पाठविण्यात आला. भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलिस करीत आहेत.