क्राईमयावल

साकळी येथे जुन्या भांडणावरून विवाहित महिलेचा विनयभंग

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतच्या निवडणूकीत हार झाल्याने या जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन महिलांना मारहाण करून विनयभंग केल्याची घटना साकळी येथे घडली.

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील साखळी येथील ४५वयवर्ष असलेली विवाहित महिला आपल्या कुटुंबियांसह रहात असून त्या महिलेचा भाचा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडूनआला असता त्यामुळे त्याचा राग मनात धरून गावातील मिलिंद साहेबराव जंजाळे, अशोक श्रावण जंजाळे, विजय प्रल्हाद जंजाळे, विलास भिला सोनवणे, विशाल प्रकाश बाविस्कर,शंकर अशोक जंजाळे, विजय हरी जंजाळे, अरूणाबाई अशोक जंजाळे, रेखा प्रकाश बाविस्कर, देवानंद जगन जंजाळे आणि नाना सूर्यभान जंजाळे यांच्यासह इतर पाच ते दहा जण सर्व रा. साकळी ता. यावल यांनी हातात लाठ्याकाठ्या घेऊन विवाहित महिला व तिच्या भाच्याला शिवीगाळ करत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच विवाहिते सोबत असलेल्या एका महिलेला देखील मारहाण केली. याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अकरा जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जितेंद्र खैरनार करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!