भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

“स्पर्धा झाली, गाजली पण… विजयी पैठणी गेली कुठे?” मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या स्पर्धेतील विजेते अजूनही पाहताहेत वाट!

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज,अक्षय काठोके|
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मुक्ताईनगर नगरपंचायतीने शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी ओला व सुका कचरा वर्गीकरण यावर आधारित एक विशेष स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा उद्देश फक्त पुरस्कार नव्हता, तर शहरातील प्रत्येक नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजवणे हा मुख्य हेतू होता.

नगरपंचायतीकडून यासाठी घराघरातून कूपन वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक गल्लीत फिरणाऱ्या कचरा संकलन वाहनांवरून स्पीकरद्वारे सातत्याने स्पर्धेची जाहिरात केली जात होती.
“स्पर्धा जिंका आणि मिळवा आकर्षक पैठणी!” असा संदेश ऐकवण्यात येत होता.

“मोठा गाजावाजा… पण निकालाचा पत्ता नाही!”
संपूर्ण शहरात स्पर्धेबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक माता-भगिनींनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने भाग घेतला. प्रत्येक कुटुंबाने कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करत स्वच्छतेचे पालन केले आणि वेळेवर कचरा देत स्पर्धेत भाग घेतला.

मात्र, आता जवळपास कित्येक महिने उलटून गेले तरी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच स्पर्धेची जाहिरात करणारे संदेशही कचरा गाड्यांवरून ऐकू येणे थांबले आहे.

“विजेत्यांची पैठणी आजही प्रतिक्षेत!”
या स्पर्धेसाठी विजेत्यांना ‘पैठणी’ देण्यात येणार असल्याची मोठ्या उत्साहात घोषणा करण्यात आली होती. मात्र आजतागायत ना कोणता अधिकृत निकाल जाहीर झाला, ना कोणाला पारितोषिक मिळाले.

शहरातील अनेक महिलांनी नागरपंचायतीकडे चौकशी करून थकून टाकले आहे, पण उत्तर मिळालेले नाही.
त्यामुळे “स्पर्धा खरंच झाली होती का? की ती फक्त प्रचारापुरती होती?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे:
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्पर्धा आयोजित
कूपन वाटप, स्पीकरद्वारे जाहिरात, कचऱ्याचे वर्गीकरण
पैठणीसाठी उत्साही प्रतिसाद
निकाल अद्याप जाहीर नाही
विजेते व नागरिक प्रशासनाकडून उत्तराच्या प्रतिक्षेत
प्रशासनाकडे पारदर्शकतेची मागणी
शहरातील नागरिकांनी आणि महिलांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीकडून पारदर्शक निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.
“स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या उपक्रमात लोकांचा सहभाग वाढावा, तर विश्वास ठेवला गेला पाहिजे. तोच जर डळमळीत झाला, तर अशा उपक्रमांचे भविष्य काय?” असा सवाल आज शहरात सर्वत्र विचारला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!