हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडले, तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची सतत मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली असून, धरणाचे १४ दरवाजे १ मिटर ने उघडण्यात आले आहेत.
तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे १४ दरवाजे एका मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या तापी नदीपात्रात २१ हजार ७५४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. या मुळे तापी नदीला पूर आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

