महाराष्ट्र बोर्डाच्या मोठा निर्णय : बोर्डाच्या दहावी – बारावी च्या परीक्षा डिजिटल पद्धतीने ; मंडळाचे अध्यक्ष कुलकर्णी यांचे संकेत
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षा पुढील काळात डिजिटल पध्दतीने घेतल्या जातील असे सुतोवाच राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मंडळ (MSBSHSE) पुढील काळात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा डिजिटल पद्धतीने घेण्याची शक्यता आहे, ज्याचा मुख्य उद्देश कागदाचा वापर कमी करणे आणि परीक्षा प्रणाली अधिक आधुनिक करणे हा आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी या बदलाचे संकेत दिले असून, यामुळे उत्तरपत्रिका मूल्यांकन आणि निकाल प्रक्रियेत पारदर्शकता व गती येईल.
डिजिटल परीक्षेबाबत मुख्य उद्देश म्हणजे कागदाची बचत: प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांसाठी लागणारा प्रचंड कागद वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. डिजिटल परीक्षा प्रणालीमध्ये प्रश्नपत्रिका ऑन-स्क्रीन उपलब्ध करून देणे किंवा संगणकावर आधारित चाचण्यांचा समावेश असू शकतो.
सीबीएसई (CBSE) २०२६ पासून बारावीच्या परीक्षांसाठी ऑन-स्क्रीन मार्किंग (डिजिटल मूल्यांकन) सुरू करत आहे, त्या धर्तीवर महाराष्ट्र मंडळही पाऊल टाकू शकते. डिजिटल प्रक्रियेमुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनातील चुका कमी होऊन निकाल अधिक जलद आणि अचूक लागण्यास मदत होईल.सध्या, महाराष्ट्र मंडळाच्या २०२६ च्या परीक्षांमध्ये तांत्रिक सज्जतेवर भर दिला जात असून, भविष्यात संपूर्ण परीक्षा प्रक्रिया डिजिटल करण्याकडे मंडळाचा कल आहे.
राज्य मंडळातर्फे बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका छपाईसाठी १० कोटी ७२ लाख ८० हजार ३६० पृष्ठे व नमूना उत्तरपत्रिकांसाठी १९ लाख २९ हजार ३८० पृष्ठे अशी एकूण कोटी ९२ लाख ०९ हजार ७४० पृष्ठांवर छपाई करण्यात आली. यामुळे पुढील काळात डिजिटल परीक्षेकडे जावे लागेल, असे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी म्हणाले…

