कालपर्यंत 50 खोके एकदम ओके म्हणणारे, पवार निधी देत नाही म्हणून बंड करणारे दोघे सत्तेत बसले– संभाजीराजे
Monday To Monday News Network|
पुणे, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा| कालपर्यंत 50 खोके एकदम ओके म्हणणारे अजित पवार व राष्ट्रवादीने आमदार आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार निधी देत नाही म्हणून बंड करणारे शिंदेंचे आमदार देखील अजित पवार यांच्या मांडिला माडी लावून सत्तेत बसले आहेत. राज्यातल्या राजकारणावर स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तथा मा. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टीका केली आहे.
- जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाची हत्या ; अपघाती मृत्यूचा बनाव पोलिसांनी उधळला
- खान्देश सुपुत्र डाॅ.पृथ्वीराज सैंदाणे याना मराठवाड्यात ( संभाजी नगर)येथे “महा अँक्युपक्चर रत्न पुरस्कार
- धक्कादायक : यावल तालुक्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी पोलीसांच्या ताब्यात
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोण कधी कोणासोबत जाईल याचा अंदाज सद्या लावण कठीण आहे. कालपर्यंत 50 खोके एकदम ओके म्हणणारे अजित पवार आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार निधी देत नाही म्हणून बंड करणारे शिंदेंचे आमदार देखील अजित पवार यांच्या मांडिला माडी लावून सत्तेत बसले आहेत. राज्यातल्या या घडामोडींवर स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.
संभाजीराजे म्हणाले, “मी आता कन्फ्यूज झालोय की, हे 9 मंत्री विकासाच्या नावाने ओरडायचे.. शाहू, फुले, आंबडेकर यांचे नाव घेतात आणि जातात कुठे? राज्यात विरोधीपक्ष आहे की नाही ? आपण म्हणतो जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र निर्माण करायचा. पण असा महाराष्ट्र आपल्याला हवा आहे का? असा महाराष्ट्र आपल्याला हवा आहे का? शिवसेना सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे. राष्ट्रवादी सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे. तुम्हाला हे राजकारण पटतंय का?” असा सवाल करत संभाजीराजे छत्रपती यांनी सद्याच्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे.





