महाराष्ट्र

आज पुन्हा अवकाळी, वादळी वारा, गारपीट, विजांच्या कडकडाटासह पाऊस,तर काही ठिकाणी उष्णतेची लाट

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकुळ मजवला आहे,तर काही ठिकाणी गारपीट, व उष्णतेच्या लाटेशी नागरिकांना सामना करावा लागत आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सांगली, अहमदनगर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. तर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, लातूर , जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, या नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई सह ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग येथे आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. इथे आज हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. एकंदरीतच ४ ते ५ जिल्हे वगळता आज राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!