महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : राज्यात आणखी मोठा राजकीय भूकंप होणार,माजी मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणखी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावाखाली कांग्रेस नेते झुकले, असे म्हणत त्यांनी नाना पटोलेंवरही निशाणा साधला.

नाना पटोले सगळं स्वःताच्या इच्छेनुसार करतात.कोणाला ही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात. वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्षा आहेत, पण त्यांना न विचारता मुंबईच्या जागांचे वाटप झाले, आणि उमेदवारही घोषित झाले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावाखाली कांग्रेस नेते झुकले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाला ज्या जागा हव्या होत्या  त्या घेतल्या आणि जे उरलं सुरलं आहे ते कांग्रेसला मिळालं.

खरं तर काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीसाठी विद्यमान नेतृत्वच जबाबदार आहे.ज्या पक्षाचं भविष्य नाही, त्या पक्षात आपलं भविष्य काय होणार? तिथे थांबून मी काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचं कारण सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!