अमळनेरजळगावमहाराष्ट्र

अमळनेर बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत, मृतांपैकी ८ जणांची ओळख पटली

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा :  आज सकाळी इंदूर येथून अमळनेरकडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळण्याची घटना घडली आहे. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अजूनही २० ते २५ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.  या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मृत्यू पावलेल्या ८ जणांची ओळख पटली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच  एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील  सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत परिपत्रक जारी करत हेल्पलाईन नंबर जारी केले आहे.  या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.

अपघातातील ८ जणांची ओळख पटली–


1.चेतन पिता राम गोपाल जांगीड, (राहणार, नांगल कला गोविंदगढ जयपूर राजस्थान)

2. प्रकाश पिता श्रवण चौधरी (वय 40, शारदा कॉलोनी अमळनेर, जळगाव महाराष्ट्र)

3.नीबाजी पिता आनंदा पाटील, (वय 60, राहणार अमळनेर)


4.जगन्नाथ पिता हेमराज जोशी  (वय 70, मल्हारगढ, उदयपूर, राजस्थान)


5. महिला कमलाबाई, पती निबाजी पाटील (वय 55, राहणार, अमळनेर जळगाव)

6.चंद्रकांत  एकनाथ पाटील, (वय 45, राहणार अमळनेर जळगाव

7.श्रीमती अरवा मुर्तजा बोरा (वय 27 राहणार, मूर्तिजापूर अकोला महाराष्ट्र)

8.सैफुद्दीन अब्बास निवासी, (नूरानी नगर इंदूर) ( मृतांच्या नावांची यादी प्राथमिक माहितीनुसार देण्यात आली आहे. मृतांच्या सामानातील आधार कार्डावरून काही नावे देण्यात आली आहेत. लवकरच पुढील नावांची खात्री होईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.)

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना  दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!