भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये चोरट्यांचा धुमाकुळ, घरफोड्यानी एकाच रात्रीत ‘चोरट्यांची दहशत’ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरात रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. शहरातील शिव कॉलनी आणि गोदावरी नगर या दोन महत्त्वाच्या वस्त्यांमध्ये शिक्षकाचे आणि डॉक्टरांच्या घरी झालेल्या या धाडसी चोरींमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. हा केवळ चोरीचा मुद्दा नसून, स्थानिक पोलीस प्रशासनाच्या रात्रीच्या गस्तीचे मोठे अपयश अधोरेखित करणारी घटना आहे.एका रात्रीत ₹ १.५६ लाखांहून अधिक ऐवज लंपास मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात २८ सप्टेंबर २०२५ रोजी दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांचा तपशील हा शहराच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करतो:

शिव कॉलनीतील शिक्षक परेश चौधरी यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज वाकवून प्रवेश केला. या घटनेत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण १,१५,०००/- रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. * गुन्हा क्र. ३०२/२०२५: गोदावरी नगर येथील डॉ. शुभम कलंत्री यांच्यासह मनोज कुलकर्णी आणि सुजीत पाटील यांच्या घरांवर चोरट्यांनी हात साफ केला. कुलकर्णी यांच्या घरात खिडकीचे ग्रिल कापून प्रवेश करण्यात आला. या घटनांमधून एकूण ४१,५००/- रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे.

एकाच रात्रीत दोन प्रमुख वस्त्यांमध्ये आणि बळजबरीने प्रवेश (ग्रिल कापणे, गज वाकवणे) करून ₹ १ लाख ५६ हजार रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरला जाणे, हे स्पष्टपणे दर्शवते की, ही केवळ किरकोळ चोरी नसून, संघटित आणि सराईत टोळीचा हा प्रताप आहे. यावरून असे दिसते की, ही भुरटे चोर नसून सराईत चोर असावे.रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्हचोरट्यांनी दोन वेगवेगळ्या भागांमध्ये एवढ्या मोठ्या घटना घडवून आणल्या, तरीही पोलीस प्रशासनाला याची कुणकुण लागली नाही, यावरून रात्रीची गस्त किती प्रभावीपणे सुरू आहे, याबद्दल गंभीर शंका उपस्थित होते. एकाच रात्रीत अशा दोन मोठ्या घटना घडणे हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात प्रशासकीय पातळीवर कुठे तरी मोठी त्रुटी असल्याचे दर्शवते.

नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर उप विभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली असली, तरी ही कारवाई केवळ गुन्हा दाखल करण्यापुरती मर्यादित न राहता, चोरट्यांचा तात्काळ शोध घेणे गरजेचे आहे.

नागरिकांची मागणी व प्रशासनाची जबाबदारी  चोरट्यांनी धाडसाने लोखंडी ग्रिल कापून घरात प्रवेश केल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिक्षक असोत वा डॉक्टर, सामान्य नागरिकही आता रात्रीच्या वेळी सुरक्षित नाहीत, अशी भावना परिसरात निर्माण झाली आहे.मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाने या घटना गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या चोरीच्या घटनां अशा घडल्या की, घर मालक व पोलीस प्रशासनाला याची कुणकुण सुद्धा लागली नाही, विशेष म्हणजे, चोरट्यांनी कटर मशीनच्या साहाय्याने खिडक्यांचे गज कापून घरात प्रवेश केला. तर काही ठिकाणी त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पीडित नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चोरी करण्याआधी चोरट्यांनी घरात कुठलातरी गुंगीकारक फवारा मारला असावा, कारण कपाट फोडून चोरी व घराचे खिडकीचे गज तोडून चोरी केली गेली तरी घरातील कोणालाही जाग आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावरून रात्रीची गस्त किती प्रभावी आह? या वर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

संघटित टोळीचा त्वरित शोध: दोन्ही गुन्ह्यांची पद्धत पाहता, स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने यामागील टोळीचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे.

रात्रीची नेमकी गस्त कशासाठी? गस्तीमध्ये वाढ
रात्रीच्या वेळी अधिक प्रभावी आणि सातत्यपूर्ण गस्त सुरू करावी, जेणेकरून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कायम राहील.गुन्हा दाखल करणे ही पहिली पायरी आहे, परंतु या ‘चोरट्यांच्या दहशतीला’ पूर्णविराम देण्यासाठी कठोर आणि परिणामकारक कारवाईची अपेक्षा स्थानिक नागरिक पोलीस प्रशासनाकडून करत आहेत. मुक्ताईनगर पोलिसांकडून नियमित रात्रीची गस्त संपूर्ण मुक्ताईनगर शहरात सुरू असते तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात घरफोडी होणे हे एक प्रकारचे पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचे बोलले जात आहे? तरी पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!