क्राईममहाराष्ट्र

राज्याला हादरवणारी सर्वात मोठी घटना ; महिलेसह दोघांना जिवंत जाळले

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी सर्वात मोठी धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळण्यात आले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कृत्यात महिलेच्या पती व तिच्या मुलाचा देखील समावेश होता. जमानी तेलामी ही महिला आणि देऊ अटलामी या पुरुषाला जिवंत जाळण्यात आलंय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. गावात काही ग्रामस्थांनी जादूटोण्याच्या संशयावरून १ मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी दोघांना मारहाण केली. यानंतर मरणासन्न अवस्थेतल्या जमानी तेलामी. वय ५२ वर्षे. आणि देउ अटलामी .वय ६० वर्षे.या दोघांना गावाबाहेरच्या नाल्यात नेलं. दोघांवर पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्यात आले.

बारसेवाडा येथील लोकांना जमनी आणि देउ जादूटोणा करत असल्याचा संशय होता. 1 मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास मरणासन्न झालेल्या दोघांना गावाबाहेरील नाल्यात नेत त्यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले. दरम्यान, पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. तपासात घटनास्थळी दोघांचेही मृतदेह जळालेले आढळले. या प्रकरणी गावातून एकूण १५ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये मृत जमानी यांचे पती देवाजी तेलामी.वय ६०. आणि मुलगा दिवाकर तेलामी.वय २८. यांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!