जळगावप्रशासनरावेर

जिल्हा परिषदेच्या काम वाटपात ठराविकावर अधिकार्यांची मेहरमर्जी अंगलट येणारं, सु. बे. अभियंत्यांच्या अनेक तक्रारी चौकशीच्या मागणीला जोर !

जळगाव, मंडे टू मंडे न्युज विशेष प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. जिल्हा परिषदेचा गेला कित्येक महिन्यापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे काम वाटप समितीची बैठक गाजवत असून त्यामुळे गेल्या बैठकीला पूर्ण अभियंत्यांना न येऊ देता हॉल लवकर खाली करायचा असल्याचे कारण देत बैठक पाच मिंटांमधे आटोपल्याचे प्रकार घडल्याचे जीप सह जिल्ह्यात चर्चिले जात असून मात्र, यामागील उद्देश दुसराच काम वाटप करतांना सर्व हिशोब आधीच मॅनेज करून सुशिक्षित बेरोजगारांना कामे वाटपात उपाशी ठेवीत आपल्या जवळच्या काही हस्तकांना मलिदा घेऊन कामे वाटप करणे आजी माजी अधिकाऱ्यांच्या अंगलट येणार असल्याची खात्री लायक माहिती मिळत असून यासंदर्भात चौकशी झाल्यास लवकरच मोठा गौडबंगाल समोर येणार आहे.

जळगाव जि.प.च्या ह्या कामे वाटपाच्या प्रकरणात मोठ्या अधिकाऱ्यांची नावे शामिल असल्याचे बोलले जात असून
काम वाटप समितीची बैठक ही फक्त नावापुरती होत असून बांधकाम विभागात  चार ते पाच हजार अभियत्याची नोदणी असताना ठराविकानाच कामे दिली जात आहे. कोणाला कामे द्यायची हे सर्व आधीच सेटलमेंट करून नियमबाह्य पद्धतीने कामे वाटपही केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सीईओ कडे तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र, नवनियुक्त सीईओ प्रकरणावर चुपी साधताना दिसत असून अधिकारीच यांना पोटाशी घालत असल्याचे बोलले जात आहे. ह्यात खरे तर राजा बोले दल हाले अशी परिस्थिती असून प्रकरणाची चौकशी झाल्यास कर्मचार्यासह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रावेर यावल तालुक्यातील बांधकाम व बंधाऱ्याच्या कामे ठरावीकानाच नियमबाह्य देण्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन अधिकारी व नव्याने रुजू झालेले अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल पाटील यांनी चंग बांधत धेय्य निच्चीत केल्याचे दिसून येत असून बंधाऱ्यांच्या कामां वाटपाबाबत चौकशी झाल्यास मोठा घोटाळा समोर येणार असून आजी माजी अधिकात्यांची पितळ उघडं होण्याची दाट शक्यता आहे.  शासकीय मंजुरी कामांची मनमर्जी तसेच आर्थिक फायद्याच्या तत्वांवर वाटप करण्यात आलेले येत असलेली शेकडो कामांमधे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मिलीभगत व अभय असल्याने गैरफायदा घेत दुसरे कर्मचारीही यात खीर खात असल्याची खात्री लायक माहिती मिळत असून पात्र बेरोजगारांची फसवणूक तसेच शासकीय कामात मोठा घोटाळा समोर येणार आहे.

काम वाटपची समिती मॅनेज़ होऊ नये !

काम वाटप समितीच्या माध्यमातून कामांचे वाटप होते. तेथे
कोणतेही काम मैनेज होणार नाही याची काळजी घ्यावी लागते, जास्त मागणी आलेल्या कामांना लकी ड्रॉ पद्धतीने करण्याची नियम असताना असली कुठलीच प्रक्रिया जीपची काम वाटप समिती राबवताना दिसत नाही, येथे सर्व मॅनेज असून मीटिंग फक्त नावापुरती घेतली जात असल्याने सुशिक्षित बेरोजगारांनी या समितीवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या आरोपांची चौकशी वरीष्ठ पातळीवरून केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येणार असल्याचे बोलले जात आहे.

“वरीष्ठ पातळीवर, जिल्हाधिकारी व सी ई ओ न च्या भूमिके कडे लक्ष…

या संपुर्ण प्रकरणाच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व  सीईओकडेही गेल्या आहेत. त्यावर कारवाई होताना अद्याप दिसत नसल्याने वरीष्ठ पातळीवरही तक्रारी गेल्याचे समजते या प्रकरणात काय कारवाई होते याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!