महाराष्ट्र

काँग्रेसचे निवडणूक चिन्ह “पंजा” बदला किंवा पोलिस दलाच्या बोधचीन्हातील “पंजा” काढा, निवडणूक आयोगाकडे तक्रार

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आता पक्ष चीन्हावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता “पंजा” या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्या मुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका अशी मागणी वजा तक्रार निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच या तक्रारीवर तात्काळ निर्णय न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचे देखील अशोक तावरे यांनी सांगितलं

पोलीस दलाच्या बोधचिन्हामध्ये पंजा चिन्हाचा वापर करण्यात आला आहे.आणि कांग्रस पक्षाचे निवडणूक चिन्ह देखील पंजा आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रचारापासून तर मतदान होई पर्यंत पोलिस कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशावर देखील पंजा चिन्ह असतं. त्यामुळे त्यांच्या गणवेशावर असलेल्या ‘पंजा’ मुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार मनसे कडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक तर काँग्रेस पक्षाचे ” पंजा ” हे चिन्ह बदलावं किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हातील “पंजा” काढून टाकावा अशी मागणी निवडणूक आयोगाला केलेल्या तक्रारीत केली आहे.

या आधी शिवसेनेच्या पक्ष चिन्हाचा वाद, त्या नंतर राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हाचा वाद न्यायालय पोहचला आहे. असे असताना आता काँग्रेस पक्षाच्या ‘ पंजा ‘  या चिन्हावरही तक्रार करण्यात आली आहे. आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.

१९५१ – ५२ सालची पहिली निवडणूक ही काँग्रेसनं पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली “बैलजोडी” या चिन्हावर लढली होती. ग्रामीण भागातील लोक आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हे चिन्ह निवडण्यात आलं होतं. या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठं बहुमत प्राप्त झालं.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि नंतर लाल बहादूर शास्त्रींच्या निधनानंतर इंदिरा गांधी या पंतप्रधान बनल्या. १९६७ सालच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू होऊन काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि कामराज, मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली मूळ काँग्रेस आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली एक काँग्रेस असे दोन गट बनले. त्यावेळी मूळ चिन्ह असलेली “बैलजोडी” हे मोरारजी देसाईंच्या काँग्रेसला देण्यात आलं आणि इंदिरा गांधींना “गाय-वासरू” हे चिन्ह मिळालं. पुढे नंतरच्या काळात १९७७ मध्ये काँग्रेसमध्ये आणखी एक फूट पडली. त्यावेळी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (आय) ची स्थापना करण्यात आली आणि त्याला हात हे चिन्ह मिळालं.

१९७७ च्या निवडणूक जबरदस्त हार झाली त्या वेळी त्यांचं चिन्ह गाय – बछडा होत.त्या नंतर इंदिरा गांधी उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात सरयु नदी किनारी सिद्ध संत देवरहा बाबा यांचे दर्शन घेण्याचा सल्ला देण्यात आला. इंदिरा गांधी यांनी तेथून ४० किलोमिटर वार असलेल्या सिद्ध संत देवरहा बाबा याच्या आश्रमात जाऊन त्यांचे दर्शन घेतले.त्या वेळी त्यांनी हात वर करून आशीर्वाद दिले .व हा हात तुमचं भल करेल असा आशीर्वाद दिला.त्या आशिर्वादावर विश्वास ठेऊन इंदिरा गांधी यांनी निवडणुक आयोगाला पत्र लिहून गाय – बछडा जागी हाताचा पंजा हे चिन्ह मागून घेतलं. तेव्हा पासून आज पर्यंत पंजा हे चिन्ह काँग्रेसच आहे.

  १९८० साली मात्र पुन्हा विजय झाला. त्यामुळे हात हे चिन्ह कायम ठेवण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला. तेव्हापासून काँग्रेसचे हात हेच चिन्ह कायम राहिलं आहे. तर पोलीस दलाच्या बोधचिन्हामध्ये “पंजा” या चिन्हाचा वापर करण्यात आला आहे. पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या गणवेशावर सुद्धा पंजा चिन्ह असल्याने हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याने एक तर काँग्रेस पक्षाचे ” पंजा ” हे चिन्ह बदलावं किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हातील “पंजा” काढून टाकावा अशी मागणी निवडणूक आयोगाला केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!