आम्ही पाठिंबा काढलाय, सरकारने बहुमत सिद्ध करावे– शिंदेचे राज्यपालांना पत्रं
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : आम्ही ठाकरे सरकारचा पाठिंबा काढत आहोत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा असं पत्रं एकनाथ शिंदे गटाने राज्यपालांना पत्र पाठवलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारण मोठा उलथापटलथी होणार आहे.
- सावदा शहराचे गॅस वितरण ‘शहरी’ वर्गीकरणात करून ४५ दिवसांची जाचक अट कमी करावी– गटनेत्या रंजना भारंबे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
- नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी ! ३० ऑगस्टला कोथळीत राजकीय, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
- आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून गांधी चौकात जलकुंभ उभारणीच्या जागेची गटनेत्या रंजना भारंबे यांनी केली पाहणी, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना !
शिवसेना नेतृत्व विरुद्ध बंडखोर गट यांच्यात सुरू असलेला वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत पक्षापासून दूर झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने न्यायालयात याचिका केली. आम्ही ३८ आमदारांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढल्याने राज्य सरकार अल्पमतात आलं आहे, असा दावा या याचिकेत शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाची ही भूमिका समोर आल्याने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. यात आता राज्यपालांना पत्र दिल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. बातमी अपडेट होत आहे, रिफ्रेश करत रहा.





