रावेर नगरपालिका सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन, ठेकेदाराची मनमानी
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर नगर परिषदेच्या कंत्राटी ३० सफाई कामगारांनी ११ सप्टेंबर २०२५ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आस्था स्वयंम रोजगार सहकारी संस्था, धुळे या घनकचरा ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनामागे कामगारांच्या वेतन, सुरक्षा, आणि कामाच्या अटींबाबत असलेल्या गंभीर मागण्या त्वरीत
पुर्ण कराव्या अशी मागणी सफाई कामगारांनी तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सन २०२१ पासून आस्था स्वयंम रोजगार सहकारी संस्था, धुळे या घनकचरा ठेकेदाराकडे रावेर नगर परिषदेचा घनकचरा ठेका आहे. तथापि, ठेकेदाराने शासकीय नियमानुसार निश्चित केलेल्या कामगारांसाठी आवश्यक सुविधांच्या नियमांची पायमल्ली केली आहे. कामगारांना नियमाप्रमाणे वेतन न देत नाही, तसेच वेळेवर वेतन न देणे, आवश्यक सुरक्षा किट, गन बुट, रेनकोट तसेच पीएफ मेडिकल सुविधा न देण्यात आल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याशिवाय, कालबाह्य आणि खराब स्थितीतली वाहने चालवून कामगारांवर अतिरिक्त भार टाकल्याचा आरोप आहे. सफाई कामगारांनी तहसिलदार यांच्या माध्यमातून आयुष प्रसाद जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव आणि प्रमुख अधिकाऱ्यांना तक्रार दिली असून, रावेर नगर परिषदेच्या मुख्यअधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन न्याय देण्याची विनंती केली आहे.
कामगारांचे मुख्य मागण्या या प्रकारच्या आहेत: वेतन वेळेवर आणि पूर्ण प्रमाणात देणे, आवश्यक सुरक्षा किट, कार्यशील गन बुट व रेनकोट पुरवठा, पीएफ आणि मेडिकल सुविधा मर्यादेवर लागू करणे, चालू आणि सुरक्षित वाहने देणे, कामाचा भार कमी करणे आणि कामगारांचा योग्य आदर राखणे. या मागण्यांसंदर्भात कोणती ही दखल न घेतल्यामुळे कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रावेर शहरातील स्वच्छता व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगर परिषदेच्या प्रशासनाकडे आता त्वरित आणि योग्य कारवाई करण्याची गरज आहे. या समस्या तातडीने सोडविल्या नाही तर नागरिकांना स्वच्छतेच्या सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ कामगारांचेच नाही तर पूर्ण नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. रावेर नगर परिषदेचे घनकचरा ठेकेदार आस्था स्वयंम रोजगार सहकारी संस्थेने कामगारांच्या मूलभूत हक्कांचा भंग केला आहे, ज्यामुळे सफाई कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. प्रशासनाने याकडे गंभीर दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्य आणि नगरपरिषदेच्या स्वच्छतेच्या हक्कासाठी योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी आशा आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
दरम्यान सफाई कामगारांच्या या काम बंद आंदोलनामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी पसरली आहे . त्या मुळे मात्र नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा